मी लेखक नव्हे. हे फक्त मला पडलेले काही प्रश्न आहेत. का कोणासठावूक पण मला असं वाटतं की हे प्रश्न प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी-न-कधी पडत असावेत. या प्रश्नांची उत्तरं मिळवीत अशी माझी अपेक्षा पण नाही. कारण हा फक्त दोघांच्या विचारांमधला मतभेद आह. याने प्रेम कमी-जास्त होत नसतं .
एखाद्याला वयाच्या कोणत्या वर्षी प्रेमाची अनुभूती यावी हे सांगता येणार नाही. संततधार पडणाऱ्या रम्य पावसात अचानक विजा कडाडून ढगफुटी व्हावी असं काहीतरी घडतं का? आणि असं काही फिल्मी घडत नसेल तर आयुष्यात अचानक इतका बदल का येतो ?
माझं माझं काहीतरी चालू असतांना, कॉलेज-मित्र-मैत्रींनी-अभ्यास-नातेवायिक यांच्यात मी गुंतले असताना का असं होतं की कोणीतरी येऊन त्या सगळ्यावर कब्जा करतो? माझ्या imagination मध्ये असलेल्या ideal मुलासारखा तो अज्जिबात नाही. तरीपण का असं होतं की सूत्रधार तो बनतो?
PHASE 1:
मला दिवसातून एकदातरी भेटणं त्याच्यासाठी गरजेचं असतं . मी मात्र माझ्या routine ला धक्का न लावू देता उरल्या सुरल्या वेळेत जमलंच तर त्याला भेटते . आणि मी भेटले नाही की त्याच्या मनाची घालमेल होते . मग फोन sms याचा भडीमार होतो . मला पाहिलं की मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असा समाधानी भाव पसरतो . तो मला भेटण्यासाठी निरनिराळी कारणं शोधात राहतो . माझे सगळे हट्ट पुरवून , माझी बारीकसारीक कामे करून असा दर्शवतो जणू काही माझी पूर्ण जवाबदारीच त्याने उचलली आहे . 6 ला भेटायचं ठरलं कि 5.45 ला हमखास तयार असणार .मी म्हणेल ती पूर्व दिशा . माझ्या वेळेनुसार त्याच्या बाकीच्या activities adjust होतात . मग माझ्या वेळेत बसण्यासाठी तो त्याच्या मित्रांशी काय तर आई -बाबांशी देखील टोलवा-टोलव करतो . काय कोणास ठावूक पण माझ्या प्रत्येक problem च solution त्याच्याकडे असतं . मला न आवडणारी किव्वा जरा जास्तच आवडणारी लोकं त्याला खटकतात . काय बरोबर काय चूक हे मला छान समजावून सांगतो . त्याची चूक नसताना कोणत्याही प्रकारचा अभिमान न बाळगता पटकन sorry म्हणून टाकतो . काहीतरी खिडूक-मिडूक भांडणामुळे माझ्या डोळ्यात आलेला अश्रूचा थेंब पाहून त्याचा जीव अर्धमेला झालेला पाहिलाय मी .
PHASE 2:
असंच काही महिने रीतसर चालू राहिलं की माझे विचार बदलू लागतात . माझी इतकी काळजी घेणाऱ्या, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या मित्रामध्ये आता मला माझा companion दिसू लागतो . कोणत्याही प्रसंगी एक आधारस्तंभ आहे असं समजून मी निश्चिंत होते . यापुढे काही काळ 'तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी ' अश्या गोडीगुलाबित जातो . नदीच्या पात्रात एखादं झाडाचं पान गळून पडलं की त्याला कुठे माहित असतं की त्याचा प्रवास आता फक्त त्या नदीच्या प्रवाहावर अवलंबून आहे? आणि मग सुरु होते ती कधी न संपणाऱ्या प्रश्नांची साखळी .
PHASE 3:
आता मला दिवसेंदिवस न भेटता तो कसा राहू शकतो ? जमलंच तर भेटू असं त्याचा दृष्टीकोन कसा काय झाला ? फोन किव्वा sms वर बोलायला काहीच का उरत नाही ? आता माझी कामं करायला त्याला वेळ नसतो की interest नसतो ? 6 ला भेटू असं सांगून 9 पर्यंत त्याचा पत्ता का नसतो ? त्याच्या सगळ्या activities करून झाल्या तर उरलेल्या वेळेत त्याला माझी आठवण होते असं का बरं ? हल्ली माझे problems त्याला सांगू का नको असं प्रश्न मला का पडतो ? त्याच्या जुन्या-नवीन मैत्रिणी मला का खटकू लागतात ? मला बरोबर-चूक सांगणारं कोणीतरी हवं असं तो असताना देखील मला का वाटू लागतं ? काहीतरी खिडूक-मिडूक भांडण दिवसेंदिवस का चालू राहत ? आता माझ्या डोळ्यातून जे वाहतंय ते फक्त पाणीच उरलय का ? खरंच फक्त पाणीच उरलय का?